पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  विलासराव देशमुख फाउंडेशनचे महिला सक्षमीकरणासाठी नवे पाऊल; महापूरमध्ये मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्र सुरू शनिवार, दि. १७ मे २०२५: विलासराव देशमुख फाउंडेशनने महापूरमधील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. गावात मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील आणि विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक संगीता मोळवणे यांच्या हस्ते करण्यात आला. ट्वेंटीवन ॲग्रीच्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने विलासराव देशमुख फाउंडेशनने हे मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. महापुर येथे सुरू झालेल्या या केंद्रात महिलांना ३ महिन्यांचे मोफत शिलाई प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकतील. प्रशिक्षणात शिलाईच्या विविध पद्धती शिकवल्या जाणार आहेत. या प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभाला गावच्या सरपंच कल्पना माने, वारकरी संप...
इमेज
पुण्यात AIIMS विद्यार्थ्याची आत्महत्या : शैक्षणिक तणाव  पुण्यात 12 मे 2025 रोजी AIIMS भोपाळमध्ये MBBS शिकणाऱ्या उत्कर्ष शिंगणे या 20 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणेच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी त्याने एक सुसाईड नोटही शेअर केली होती, ज्यात त्याने अभ्यासक्रमातील बदलांची मागणी केली. ही घटना वैद्यकीय शिक्षणातील तणाव, मानसिक आरोग्य आणि अभ्यासक्रमातील असमाधान यावर गंभीर प्रश्न उपस्थित करते.    विस्तृत वृत्तांत (पुणे – AFMC मध्ये MBBS विद्यार्थ्याची आत्महत्या): पुण्यातील सशस्त्र बल वैद्यकीय महाविद्यालय (AFMC) येथे १२ मे २०२५ रोजी एक धक्कादायक घटना घडली. भोपाळ येथील AIIMS महाविद्यालयाचा २० वर्षीय MBBS विद्यार्थी उत्कर्ष महादेव शिंगणे याने वसतिगृहाच्या बाथरूममध्ये आत्महत्या केली. उत्कर्ष हा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील रहिवासी होता. AFMC मध्ये सुरु असलेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तो ८ मे रोजी पुण्यात आला होता. घटनेच्या आधीच्या दिवशी, म्हणज...
इमेज
 राज्य व केंद्र शासनाचे क्रीडाविषयक प्रकल्प राबवण्यासाठी मुरुडअकोला येथील वन विभागाच्या ताब्यातील जमीन उपलब्ध करून द्यावी   वनमंत्री गणेशजी नाईक यांच्याकडे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची मागणी     वनविभागाच्या ताब्यात असलेली पेठ येथील गायरान जमीन महसूल विभागाला परत करावी   साखरा  येथील आदरणीय विलासराव देशमुख वन उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करावे   लातूर व मराठवाड्यात वनक्षेत्र वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी  लातूरच्या मागण्या संदर्भात वनमंत्र्यांनी मुंबई येथील सह्याद्री विश्रामगृह येथे येथे आयोजित केलेल्या विशेष बैठकीत सकारात्मक चर्चा  मुंबई (प्रतिनधी): महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूरच्या विकास कामासंदर्भात वेळोवेळी दिलेल्या निवेदनाच्या संदर्भाने आज त्यांनी मुंबई येथील सह्याद्री विश्रामगृह व्यापक बैठक घेतली. लातूर तालुक्यातील मुरुडअकोला येथील राष्ट्रीय महामार्गालगत  वन विभागाच्या ताब्यात असलेली शासनाची जमीन...
इमेज
  लातूरमध्ये १२ लाख ५४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त;  एकावर गुन्हा दाखल लातूर, दि. १४ मे २०२५:   लातूर पोलिसांनी मोठी कारवाई करत वाहनासह १२ लाख ५४ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध "अवैध व्यवसाय निर्मूलन अभियान-१" राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कारवाई करताना, १३ मे २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला औसा येथील एक व्यक्ती प्रतिबंधित गुटखा कारमध्ये साठवून अवैध विक्री करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने १३ मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजता औसा येथील हाश्मी नगर परिसरात छापा टाकला. या कारवाईत महाराष्ट्र शासनाने राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला २ लाख ५४ हजार ७०५ रुपयांचा गुटखा आणि एक क्रेटा कार, असा एकूण १२ लाख ५४ हजार...
इमेज
  अनिता आनंद: कॅनडाच्या पहिल्या हिंदू परराष्ट्र मंत्री कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी त्यांच्या नवीन मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी त्यांच्या नवीन मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. अनिता आनंद यांच्या नियुक्तीमुळे कॅनडाच्या राजकीय इतिहासात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. त्या कॅनडाच्या पहिल्या हिंदू परराष्ट्र मंत्री ठरल्या आहेत.     अनिता आनंद यांचा परिचय: अनिता आनंद यांचा जन्म कॅनडामध्ये झाला असला तरी त्यांचे मूळ भारतीय आहे. त्यांचे आई-वडील दोघेही भारतीय वंशाचे आहेत.     त्या एक यशस्वी वकील आणि राजकारणी आहेत.     २०१९ मध्ये त्या पहिल्यांदा कॅनडाच्या संसदेवर निवडून आल्या. त्यांनी यापूर्वी संरक्षण मंत्री म्हणून काम केले आहे.     त्यांच्या कामामुळे त्यांना कॅनडामध्ये विशेष ओळख मिळाली. अनिता आनंद यांनी आपल्या कामातून कॅनडाच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नियुक्तीम...
इमेज
  लातूर ग्रामीणमधील गरजू कुटुंबांसाठी घरकुल आवास प्लस सर्वेक्षण सुरू; उद्या अंतिम मुदत! लातूर ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी घरकुल आवास प्लस सर्वेक्षण सुरू आहे आणि ही मोहीम उद्यापर्यंतच चालणार आहे. प्रशासनाने याची योग्य दखल घ्यावी, जेणेकरून एकही गरजू कुटुंब या महत्त्वपूर्ण योजनेपासून वंचित राहणार नाही. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल कुमार मीना यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. त्यामुळे ही मोहीम योग्य प्रकारे राबवली जाईल, असा विश्वास आहे. ज्या लाभार्थ्यांचे अद्याप सर्वेक्षण झाले नाही, त्यांनी त्वरित आपल्या ग्रामसेवकांशी संपर्क साधून आपले सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे. सर्वेक्षणासाठी पुन्हा मुदतवाढ मिळेल या आशेवर राहू नये, ही नम्र विनंती. धिरज विलासराव देशमुख
इमेज
  वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान ; तात्काळ पंचनामे करून मदत करा - तालुका काँग्रेसची मागणी लातूर प्रतिनिधी : लातूर तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे . आंब्यासह इतर फळबागा , फुलशेती , भाजीपाला आणि ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी , अशी मागणी लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . हे निवेदन आज , बुधवार दि . १४ मे रोजी देण्यात आले आहे . राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मागील चार पाच दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे . यामध्ये लातूर तालुक्यातील हरंगुळ येथे भाजीपाला, फळबागा आणि शेतमालाचे नुकसा...
इमेज
  लाहोटी CBSE स्कूलचा इ. १० वी व १२ वी चा निकाल  १००%; विद्यार्थ्यांची उत्तुंग कामगिरी     लातूर: राजा नारायणलाल लाहोटी (CBSE) इंग्लिश स्कूलने CBSE बोर्डाच्या इ. १० वी (AISSE - २०२५) आणि इ. १२ वी (AISSCE - २०२५) च्या परीक्षेत सलग तेराव्या आणि दहाव्या वर्षी अनुक्रमे १००% निकाल नोंदवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. इ. १० वी मध्ये भावना अबोली दत्तात्रय गोजमगुंडे या विद्यार्थिनीने ९९.४०% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला, तर इ. १२ वी मध्ये विश्वावर्धन वसंत चव्हाण या विद्यार्थ्याने ९२.२०% गुणांसह अव्वल स्थान प्राप्त केले. दहावीच्या परीक्षेत एकूण ११८ विद्यार्थी सहभागी झाले होते. यापैकी तब्बल १९ विद्यार्थ्यांनी ९५% पेक्षा जास्त, ४१ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त आणि २९ विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा जास्त गुण मिळवले. १७ विद्यार्थ्यांनी ७० ते ८०% दरम्यान गुण प्राप्त करून शाळेच्या यशस्वी परंपरेत भर घातली. ९५% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अथर्व निलेश अमले (९८.६०%), सर्वेश राविप्रसाद लोहिया (९८.६०%), आदित्य राजेंद्र बजाज (९८.४०%), रिद्धी रामकिशन बानापुरे...
इमेज
  पाणपोई’ संवेदनशीलच नव्हे तर समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे लातूर,दि.13 पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मातृत्वाच्या भावनेतून त्यांच्या राज्यामध्ये पशु व मानवासाठी पाण्याची सोय केली. आज देखील पशुंसाठी पाणपोई हे अत्यंत अतिआवश्यक असा उपक्रम आहे. लातूर शहरातील समाज बांधवांनी अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जन्म महोत्सवाच्या निमित्ताने पशुंसाठी पाणपोई चालू केली आहे. हे संवेदनशीलच नव्हे तर समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम आहे, अशा उपक्रम समाज घटकातील सर्वांनी कृतीत आणावे असे आवाहन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर-घुगे यांनी केले. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मोत्सवानिमित्त लातूर येथील सामाजीक कार्यकर्ते धनराज माने व त्यांच्या सहकार्‍यांनी जिल्ह्यामध्ये 300 पाणपोई चालविण्याचा निर्धार केला आहे. लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अशा पाणपोई चालू करण्यात येत आहेत. आज पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये पशुंसाठी पाणपोई चालू करण्यात आली. त्याचे उद्घाटन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर-घुगे यांच्या हस्ते अ‍ॅड. आण्णाराव पाटील, ज्य...
इमेज
    ज नकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल लातूर ता. १३ मे २०२५ हरंगुळ(बु) येथील जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १००टक्के निकालाची परंपरा कायम आहे. विद्यालयातील ३८ विद्यार्थ्यांनी ९० टक्यांपेक्षा अधिक गुण घेतले. तर ३५ विद्यार्थ्यांनी ९० ते ८० टक्के मध्ये गुण संपादन केले आहेत. या परीक्षेसाठी ९२ विद्यार्थी बसले होते. यातील विशेष प्राविण्यासह  ८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातून कु. शांभवी गोविंद मोटाडे हिने ९८.२० टक्के गुण घेत प्रथम, कु. शिवकन्या मल्लिकार्जुन कुरूपखेळे हिने ९७.६०टक्के गुण घेत व्दितीय, तर विद्यालयातून तृतीय  चि. अर्जुन किरण गजभार व रोहन राजाराम फुंदे यांनी ९७.०० टक्के गुण घेत पटकावला. या विद्यार्थ्यांचे तसेच दहावी प्रमुख मन्मथ खिचडे , सौ. राणीताई कुटे ,  दत्तात्रय पुरी,  गोकर्णाताई रेडेकर यांचे प्रकल्प अध्यक्ष मा. प्रकाशजी लातूरे , उपाध्यक्षा डॉ.लिलाताई कर्वा, प्रकल्प कार्यवाह श्री राजेशजी सुगरे, सहकार्यवाह श्री. उमेशजी सेलूकर ,शालेय समिती अध्यक्ष श्री . सतिशजी कुलकर्णी वसतीगृह ...
इमेज
                                    आई: एक अनमोल ठेवा तू   आहेस   मंदिराचा   उंच   कळस तू   आहेस   अंगणातली   पवित्र   तुळस तू   आहेस   भजनातील   पवित्र   अशी   संतवाणी तू   आहेस   वाळवंटात   प्यावे   असे   थंडगार   पाणी आई   तुला   मातृदिनाच्या   खूप   खूप   शुभेच्छा .. तुझ्या   उपकारांसाठी   मी   सदैव   तुझी   ऋणी   राहिन ..! मातृदिनाच्या   शुभेच्छा आई हा शब्द मनाला स्पर्श करणारा, हृदयाला हलवून टाकणारा आणि जीवनातील सर्वात पवित्र भावना व्यक्त करणारा आहे. आई म्हणजे निसर्गाची देन, प्रेमाची मूर्ती आणि त्यागाची अद्वितीय प्रतिमा. तिच्या कुशीत सर्व दुःखे विसरून जातात, तिच्या एका हसत्या चेहऱ्यामुळे जगण्याची प्रेरणा मिळते. आईच्या प्रेमाची, ममतेची आणि तिच्या त्यागाची तुलना कोणत्याही इतर नात्याशी करता येत नाही. आई हा शब्दच आपल्या मनात अनेक भावना ...